पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलता खो-खो

इमेज
या भागात आपण जुन्या खो-खो चा आणि त्यातील बदलत्या नियमांचा आढावा घेऊया. १९१४ मध्ये डेक्कन जिमखाना पुणे येथे या खेळाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले व खो-खो खेळाला नियमांच्या सुत्रा मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळातर्फे खो-खो खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम देश पातळीवर केले गेले. तसेच राष्ट्रीय स्तरावर खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यास प्रारंभ झाला.  १९६० मध्ये खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना झाली. सर्वप्रथम १९६०-६१ साली खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची पहिली पुरुष महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. त्याच वर्षी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळातर्फे सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. अशा रीतीने त्या एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले गेले. नंतर मात्र तसे काही घडले नाही. तेव्हापासून या गटाच्या ५३ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. या काळात खो-खो खेळाच्या मैदानाच्या मोजमापात एकूण चार वेळा बदल केले गेले. प्रथम १९६० च्या आधी, दुसऱ्यांदा kkfi स्थापन झाल्यावर, तिसऱ्यांदा १९८३ साली तर चौथ्यांदा १९९५ मध्ये. ...

खो-खो आणि महाराष्ट्र

इमेज
महाराष्ट्र आणि खो-खो चा संबंध तसा पारंपारिक व गौरवशाली. देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार विजेते 7 खो-खो खेळाडू हे महाराष्ट्रातील आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी असलेले एकलव्य , राणी लक्ष्मीबाई , वीर अभिमन्यू , जानकी , भरत आणि इला पुरस्कार यांच्या यादीवर नजर टाकल्यास यातील 90 टक्के पुरस्कार विजेते खेळाडू व राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू हे महाराष्ट्रातील आहे. यावरूनच या खेळातील महाराष्ट्राचे प्रभुत्व लक्षात येते. खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ही खो-खो मधील मुख्य संघटना आहे. ती विविध राज्य संघटना व त्यांच्या प्रतिनिधी द्वारा खेळाचे कामकाज चालवते. महाराष्ट्र, कोल्हापूर व विदर्भ या तीन संघटनांना राज्याचा दर्जा आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत या तिन्ही संघटनांचे स्वतंत्र संघ सहभागी होतात. महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूर या संघांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खेळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पदाधिकारी यांच्या साठी Management या विषयात एक फार छान वाक्य आहे, ते असे "whenever  authorities delegated...

खो-खो आणि नवीन नियम

इमेज
खो-खो काल, आज आणि उद्या..... वाचा चार भागात. 17 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे देशातील निवडक खो-खो खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या शेवटी मिनी खो-खो लीग घेण्यात आली. या लीगची आखणी संभाव्य अल्टिमेट खो-खो लीग सारखी करण्यात आली. साधारणता मागील तीन वर्षापासून या लीग ला मुहूर्त लाभत न्हवता. इथे सर्व प्रथम " नवे  खो-खो नियम " सर्वांना कळाले. नव्या नियमानुसार 8 ट्रॅक ऐवजी 6 ट्रॅक केले गेले. संरक्षण करण्यासाठी नेहमी प्रमाणे तीन खेळाडूंची तुकडी मैदानात येईल मात्र एक गडी बाद झाल्यावर आक्रमण थांबवले जाईल व दुसरा गडी मैदानात आल्यावर खेळ पुन्हा खुंटा वरून सुरू करण्यात येईल. त्यामुळे मैदानात कायम तीन संरक्षक असतील. खो-खो चे मैदान छोटे करण्यात आले आहे. सूर व डांब मारून गडी बाद केल्यास एक ऐवजी दोन गुण दिले जातील. इत्यादी नवे नियम तयार करण्यात आले. हे सर्व नवे नियम अल्टिमेट खो-खो साठी बनविण्यात आले आहे असे सर्वप्रथम सांगण्यात आले आणि आता हेच नियम खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया त्यांच्या सर्व नियमित स्पर्धांवर लादण्याचा तयारीत आहे. हे नवीन नि...